Wednesday, 21 August 2019

ही लढाई भारतासाठी नाही, काश्मीर साठी नाही...

ही लढाई, भारतासाठी नाही, काश्मीर साठी नाही, 
.
.
.
.
.
.
तर पृथ्वीसाठी आहे.
आपल्यासारख्या अनेक प्राणिमात्रांचं अस्तित्व आपल्याला वाचवायचं आहे.
आता हा अस्तित्व हा शब्द लाईटली घेऊ नका हं.
डायनोसॉर जसे नामशेष झाले जगातून तशी आपली मानवजात आणि अर्थातच आपल्यामुळे इतर जीवसृष्टी देखील नामशेष होण्याच्या मार्गावर आहे..
आपल्या खूप सहज साध्या दैनंदिन क्रिया ज्यांचा आपण विचारही करत नाही,
त्या आता आपलं पृथ्वीतलावरील अस्तित्व मिटवणार आहेत.
गोष्टी खूप हाताबाहेर गेल्यात, असं कितीही वाटलं तरी आता स्वतःला वाचवायचं आहे.
आपण समस्या सोडवण्याची बुद्धी जन्मतःच सोबत घेऊन आलो आहोत. 
आता फक्त थोडीशी घाई करणं गरजेचं आहे.
आणि त्याकरिता मंगळावर पाणी शोधणं , हा उपाय नाही.
आपल्या राहत्या जगाला वाचवायचं आहे.
तुम्ही एका मोठ्या सैन्याचा भाग बनू शकता,
अगदी छोट्या छोट्या सवयी बदलून,

हो ; अगदी घरी बसून.
काय करायचं, ते मी एक एक करून पोस्ट करणार आहे.
काही गोष्टी मी खूप आधीपासून करत आहे.
पण एक खरं सांगू? 
तुमच्यासोबतच मी सुद्धा काही नवीन गोष्टी करायला सुरुवात करणार आहे.
तुम्हाला जेवढ शक्य आहे, तेवढच करा, पण नक्की करा.
आणि फक्त अजून एका व्यक्तीला त्यांची फक्त एक सवय बदलायला भाग पाडा.
तुमच्या मनातली तळमळ जास्त असेल, तर तुम्ही एक पाऊल अजून पुढे नक्की टाकाल,
आणि हीच तळमळ जर तुम्ही अजून एखाद्याच्या मनात निर्माण केलीत,
तर ते सुद्धा आपणहून एक पाऊल पुढे टाकतील.
बस !!
एवढ तर आपण नक्की करू शकतो...
- समिक्षा साळुंके
- २१-०८-१९
... to be continued

No comments:

Post a Comment