Wednesday, 21 August 2019

आपण खूप चांगली माणसं आहोत. निदान आपली तरी तशी समजूत आहे.

आपण खूप चांगली माणसं आहोत.
निदान आपली तरी तशी समजूत आहे.
.
.
.
.
आपलं शिक्षण चांगलं आहे,
आपले आई वडील चांगले आहेत,
आपला अक्खा फॅमिली ग्रुप चांगला आहे.
आपण कुठे पिकनिक ला गेलो तर कचरा करत नाही,
आपल्यावर तेवढे संस्कार आहेत.
आपण भाजीवाल्यांशी २ २ रुपयांची घासाघीस करत नाही,
आपल्याकडे तेवढी दानत आहे.
आपण सिग्नलवरच्या पोरासोरांकडून त्यांना मदत म्हणून काही बाही विकत घेतो.
आपण गाडीतून प्रवास करताना कुरकुरेचे पाकीट बाहेर फेकत नाही,
फक्त केळ्यच्या आणि संत्र्याच्या साली टाकतो.
हल्ली, मॉल मध्ये, किव्वा सुपर मार्केट मध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांना ५ -१० रुपये मोजावे लागतात, 
म्हणून आपण आठवणीने तिथे जातांना , घरून मोठ्या थैल्या घेऊन जातो.
आपण आपले POP चे गणपती कृत्रिम तलावात विसर्जित करतो.
म्हणजे कसं आहे ना...
आपल्याला अक्कल आहे.
आपल्यावर चांगले संस्कारही आहेत.
फक्त आपण ते योग्य ठिकाणी वापरत नाही आहोत.

- समिक्षा साळुंके 
- १८-०८-२०१९
...to be continued

No comments:

Post a Comment