मी ना, या देवाधर्माच्या पोस्ट्स आवर्जून वाचते
देवभोळी किंवा नास्तिक आहे म्हणून नाही, तर हे शास्त्र शास्त्र म्हणजे असतं तरी काय ते जाणून घेण्यासाठी. पटलं तर घेते नाहीतर सोडून देते.
त्यादिवशी सत्यनारायण पूजेसंदर्भात एक व्हॉट्सऍप पोस्ट वाचली, की कसं ही पूजा केल्याने घराचं वातावरण छान होतं वगैरे..
तर त्या सत्यनारायणाच्या पोस्टमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट होती..
पंचामृताने केलेला प्रयोग..
पुढे साक्षात श्री. अभय शरद देवरेंच्या शब्दांत दिला आहे.
"सत्यनारायणाच्या पूजेत आवर्जून तीर्थ म्हणून दिले जाणारे पंचामृत हे शेतात बायोकल्चर म्हणून वापरले जाऊ शकते याची कल्पना आहे ?
साता-यातील एक अवलिया शास्त्रज्ञ श्री शेखर कुलकर्णी यांनी त्यावर एक प्रयोग केला. त्यांनी आपल्या गच्चीवरील मातीविरहित बाग पंचामृताच्या साहाय्याने तयार केली.
दूध, दही, साखर, मध आणि तूप हे एकत्र करून पंचामृत तयार केले.
श्री. कुलकर्णी यांनी एका कुंडीत सर्वात खाली नारळाच्या शेंड्या टाकल्या. त्यावर दोन चमचे पंचामृत टाकले. त्यावर घरातला ओला कचरा टाकून पुन्हा दोन चमचे पंचामृत टाकले.
असेच दोन थर तयार करून एक झाड सोबत असलेल्या मातीसहीत लावले.
पुढील २१ दिवसात पंचामृताने कच-याचे विघटन केले आणि झाड तरारून वाढले. त्यानंतर त्यात रोजचा कचरा टाकून झाडाला वाढवले.
अशा प्रकारे त्यांनी गच्चीत अनेक झाडे फुलवली आहेत."
आता, मागे सांगितल्याप्रमाणे मी जरा ट्युबलाईट असल्यामुळे, माझ्या डोक्यात लिंक जरा लेट लागली.
गणपतीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या वेळी आपण पंचामृत वापरतो, मोदकासाठी आणलेले नारळ ही घरात असतात, आणि नैवेद्यासाठी आपण निरनिराळ्या भाज्या या दिवसांत करतो, शिवाय रोज निर्माल्य तयार होतंच..
तुम्हांला नाही वाटत का, की हा मुहूर्त मस्त आहे आपापल्या घरी कंपोस्ट खत तयार करण्यासाठी?
एक मोठी कुंडी, किव्वा एखादा जुना माठ घेऊनही सुरू करता येईल. अगदी खाली नारळाच्या शेंड्या आणि कवच फोडून टाकायचं, त्यावर पंचामृत, त्यावर भाज्यांचा ओला कचरा, पंचामृत, निर्माल्य, असे एकावर एक थर रचत जायचे रोज.
एकवीस दिवसांत, हे सर्व विघटन होऊन खत तयार होईल आणि त्यात एखादं छानसं फुल झाड लावता येईल.
मी तर म्हणेन, झेंडूचेच झाड लावा, आणि पुढील वर्षी, याच झाडाची फुले आपल्या गणेश पूजनात वापरा. शिवाय झेंडूचे झाड हे Mosquito Repellent म्हणजेच डांस आणि कीटकांना दूर ठेवणारे आहे.
तर या प्रयोगाचे फायदे अनेक आहेत, असं दिसतंय.
नुकसान असेल, तरी ते प्रयोग केल्याशिवाय तर कळणार नाही.
ज्यांच्या घरी सुदैवाने, गणपती बसविला जातो, त्यांच्यासाठीच हा मुहूर्त आहे बरं का!
पोस्ट थोडी लेट झाली असली, तरी पुन्हा एकदा पंचामृत आणि मोदकाचा घाट घालून 😋, याला सुरुवात कराच.
शिवाय त्या पोस्टमध्ये वाचलं होतं, त्याप्रमाणे मोदक बुद्धिवर्धक असतात म्हणे..
आपल्याला काय, मोदक खायला अजून एक बहाणा मिळतोय, तर कशाला सोडा?
- समिक्षा साळुंके
- ०५-०९-२०१९
... to be continued
देवभोळी किंवा नास्तिक आहे म्हणून नाही, तर हे शास्त्र शास्त्र म्हणजे असतं तरी काय ते जाणून घेण्यासाठी. पटलं तर घेते नाहीतर सोडून देते.
त्यादिवशी सत्यनारायण पूजेसंदर्भात एक व्हॉट्सऍप पोस्ट वाचली, की कसं ही पूजा केल्याने घराचं वातावरण छान होतं वगैरे..
तर त्या सत्यनारायणाच्या पोस्टमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट होती..
पंचामृताने केलेला प्रयोग..
पुढे साक्षात श्री. अभय शरद देवरेंच्या शब्दांत दिला आहे.
"सत्यनारायणाच्या पूजेत आवर्जून तीर्थ म्हणून दिले जाणारे पंचामृत हे शेतात बायोकल्चर म्हणून वापरले जाऊ शकते याची कल्पना आहे ?
साता-यातील एक अवलिया शास्त्रज्ञ श्री शेखर कुलकर्णी यांनी त्यावर एक प्रयोग केला. त्यांनी आपल्या गच्चीवरील मातीविरहित बाग पंचामृताच्या साहाय्याने तयार केली.
दूध, दही, साखर, मध आणि तूप हे एकत्र करून पंचामृत तयार केले.
श्री. कुलकर्णी यांनी एका कुंडीत सर्वात खाली नारळाच्या शेंड्या टाकल्या. त्यावर दोन चमचे पंचामृत टाकले. त्यावर घरातला ओला कचरा टाकून पुन्हा दोन चमचे पंचामृत टाकले.
असेच दोन थर तयार करून एक झाड सोबत असलेल्या मातीसहीत लावले.
पुढील २१ दिवसात पंचामृताने कच-याचे विघटन केले आणि झाड तरारून वाढले. त्यानंतर त्यात रोजचा कचरा टाकून झाडाला वाढवले.
अशा प्रकारे त्यांनी गच्चीत अनेक झाडे फुलवली आहेत."
आता, मागे सांगितल्याप्रमाणे मी जरा ट्युबलाईट असल्यामुळे, माझ्या डोक्यात लिंक जरा लेट लागली.
गणपतीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या वेळी आपण पंचामृत वापरतो, मोदकासाठी आणलेले नारळ ही घरात असतात, आणि नैवेद्यासाठी आपण निरनिराळ्या भाज्या या दिवसांत करतो, शिवाय रोज निर्माल्य तयार होतंच..
तुम्हांला नाही वाटत का, की हा मुहूर्त मस्त आहे आपापल्या घरी कंपोस्ट खत तयार करण्यासाठी?
एक मोठी कुंडी, किव्वा एखादा जुना माठ घेऊनही सुरू करता येईल. अगदी खाली नारळाच्या शेंड्या आणि कवच फोडून टाकायचं, त्यावर पंचामृत, त्यावर भाज्यांचा ओला कचरा, पंचामृत, निर्माल्य, असे एकावर एक थर रचत जायचे रोज.
एकवीस दिवसांत, हे सर्व विघटन होऊन खत तयार होईल आणि त्यात एखादं छानसं फुल झाड लावता येईल.
मी तर म्हणेन, झेंडूचेच झाड लावा, आणि पुढील वर्षी, याच झाडाची फुले आपल्या गणेश पूजनात वापरा. शिवाय झेंडूचे झाड हे Mosquito Repellent म्हणजेच डांस आणि कीटकांना दूर ठेवणारे आहे.
तर या प्रयोगाचे फायदे अनेक आहेत, असं दिसतंय.
नुकसान असेल, तरी ते प्रयोग केल्याशिवाय तर कळणार नाही.
ज्यांच्या घरी सुदैवाने, गणपती बसविला जातो, त्यांच्यासाठीच हा मुहूर्त आहे बरं का!
पोस्ट थोडी लेट झाली असली, तरी पुन्हा एकदा पंचामृत आणि मोदकाचा घाट घालून 😋, याला सुरुवात कराच.
शिवाय त्या पोस्टमध्ये वाचलं होतं, त्याप्रमाणे मोदक बुद्धिवर्धक असतात म्हणे..
आपल्याला काय, मोदक खायला अजून एक बहाणा मिळतोय, तर कशाला सोडा?
- समिक्षा साळुंके
- ०५-०९-२०१९
... to be continued
No comments:
Post a Comment