Thursday, 12 September 2019

तुझं काम तू कर, तर जगाचं भलं होईल


किती जणांचे पालक त्यांना हे सांगतात ते माहीत नाही, 
पण मला माझ्या आई बाबांनी हेच शिकवलंय, 
की आपल्या कामाचा भार दुसऱ्यावर पडू द्यायचा नाही, 
आपली कामं आपली आपण करायची.

अगदी शाळेत सुद्धा आपल्याला नैतिक शिक्षण मध्ये हे धडे दिले असतील. हो की नाही?

मग मोठं झाल्यावर काय शिंगं फुटली वाटतं सगळ्यांना?

आपला पसारा आपण आवरावा, असं आपण मुलाबाळांना शिकवतो,
आणि आपला कचरा मात्र सरकारने काढावा अशी अपेक्षा करतो..!
अर्थात सरकारने काही गोष्टी करायला हव्यात हे जितकं खरं आहे, 
तितकंच खरं हेही आहे, की आपण स्वतःला खूप लाडवून ठेवलेलं आहे.

सरकारची कामं सरकार करत नाही, तर मी का टॅक्स भरायचा वगैरे बंड सगळेच पुकारतात.
सरकारकडून काही होणार नाही, आपणच केलं पाहिजे, असा विचार करून सरकारला फाट्यावर मारुन करणारे थोडे फार असतात..
आणि त्याहून कमी असतात, कायद्याच्या चौकटीत राहून, सरकारच्या निरनिराळ्या योजनांचा शोध लावून, त्याचा फायदा समाजकार्यासाठी करून घेणारे..

तर असो,
मुद्द्याला हात घालूयात..
काल जेजुरीच्या फॅक्टरीची गोष्ट वाचून, सचिन लिमये नावाच्या माझ्या मित्र काकांनी, मला एक फॉरवर्ड पाठवले.

ऊर्जा फौंडेशन तर्फे "my plastic is my responsibility" नावाने एक कॅम्पेन केलं जातं, 
ज्यात ते तुमच्या शहरात येऊन, एका ठिकाणी असं प्लॅस्टिक आणि इ-कचरा जमा करतात, 
आणि आपल्या जेजुरीच्या जादूच्या फॅक्टरीमध्ये पाठवतात.

आता या महिन्यात २२ तारखेला ते ठाणे आणि डोंबिवली मध्ये कलेक्शन साठी येणार आहेत.
तर आसपास राहणाऱ्यांनी, आपले प्लॅस्टिक आणि इ-वेस्ट एकत्र करून ठेवा..
खाली मी त्यांचा मेसेज सुद्धा पाठवत आहे.
तुम्हांला नक्की काय काय, कसं आणि कुठे द्यायचं ते त्या मेसेज मध्ये समजेल.

- समिक्षा साळुंके
- १२-१०-२०१९
...to be continued

No comments:

Post a Comment